राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

। मुंबई । प्रतिनिधी ।

विज्ञानलेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृध्द करण्याच्या उद्देशाने, मराठी विज्ञान परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा घेतली जाते. विद्यार्थी गटासाठी (इ. बारावीपर्यंत) विषय ‘इ-कचरा’ आणि खुल्या गटासाठी ‘प्रकाश प्रदूषण’ हे विषय आहेत. निबंध स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी असून अतिंम मुदत 31 ऑगस्ट आहे. शैक्षणिक गटात रु.2,000 व रु.1,500 आणि खुल्या गटात रु.2,500 व रु.2,000 अशी पारितोषिके आहेत. या विनाशुल्क स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी चुना भट्टी (पू.) येथील वि.ना.पुरव मार्गावरील मराठी विज्ञान परिषद (022) 48263750 किंवा 48260094 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version