प्रवेश शुल्क परत करण्यासाठी कुलगुरूना निवेदन

। वावोशी । वार्ताहर ।
मुंबई विद्यापिठा अंतर्गत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने वसूल केलेले प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांना परत करून कोरोना काळात ज्या विद्यार्थ्याचे पालक कोरोनाने मृत्यू झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात यावा अशा अनेक मागण्यांचे निवेदन बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांच्याकडून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांना देण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे काही महाविद्यालय विद्यापीठाचे नियम पायदळी तुडवीत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने प्रवेश शुल्क घेत असल्याने अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 120 रूपयांमध्ये प्रवेश मिळावा, कोरोना काळात ज्या पालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे त्यांचे पाल्याकडून आणि ज्या विद्यार्थ्याचे पालक मृत्युमुखी पडले अशा विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क घेण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांच्याकडून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर यांना देण्यात आले आहे.

Exit mobile version