| माणगाव | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील वरसे गावचे सुभाष बापूसाहेब दळवी यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार रविवार (दि.30) रोजी जोतिबा रॉयल रिसॉर्ट, श्री क्षेत्र जोतिबा ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथे प्रा. जयंत आसगावकर यांच्याहस्ते देण्यात आला. या कार्यक्रमास प्रा. किसनराव कुराडे, संजय पवार, संजय भगत, शीतलकुमार डोईजड, अरविंद मानकर, निवास मोटे, सुरेश उगारे, उज्वला सातपुते, दत्तात्रय सूर्यवंशी, शशिकांत म्हेत्तर आदी मान्यवरांसह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.