भागीदारांच्या त्रासामुळे जीवन संपवलं
| पेण | प्रतिनिधी |
भागीदारांच्या त्रासाला कंटाळून मंदार सुरेश म्हात्रे, रा. वाशी नाका याने कासमाळ येथे जाऊन पिंपळाच्या झाडाशेजारी आपले जीवन संपवले. आत्महत्येच्या आधी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती कृषीवलच्या हाती लागली आहे. याप्रकरणी मंदारच्या भावाने पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, अद्याप एक फरार आहे.
![](http://krushival.in/grygrars/2024/02/pen-5-1024x576.jpg)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंदार सुरेश म्हात्रे, संजय शंकर पाटील (काळेश्री), मोहन शिवराम म्हात्रे (भाल) आणि अविनाश म्हात्रे हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय भागीदारीमध्ये करीत होते. त्यांनी एकत्रित एक व्यवहार केला. त्या व्यवहाराच्या पैशावरुन आपापसात वाद झाल्याने मंदार याचे भागीदार त्याला त्रास देऊ लागले. त्या त्रासाला कंटाळून मंदाराने आत्महत्या केली, अशी फिर्याद मंदारचा भाऊ मंगेश म्हात्रे याने पेण पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार, पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई. प्रतिक पोकळे हे अधिक तपास करीत आहेत.
या गुन्ह्यातील दोन आरोपी मोहन म्हात्रे आणि अविनाश म्हात्रे यांना पोलिसांना अटक करण्यात यश आले असून, सकाळच्या सत्रात त्यांना न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे. तर, तिसरा आरोपी संजय म्हात्रे याचा शोध पोलीस घेत आहेत.