कर्जत येथील पत्रकार परिषदेत केले जाहीर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला राजीनामा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रावादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकीने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
आम्ही आघाडीचा धर्म पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत, मात्र कर्जत-खालापूर तालुक्यात शिवसेना स्वबळाचा नारा देत आहे.अशावेळी पक्षाचा निर्णय मान्य करणे आपल्यावर बंधनकारक असल्याने होणारी घुसमट आपल्या तत्वांना पटणारी नाही आणि म्हणून पक्षनिष्ठा महत्वाची असून आपण पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पदावरून स्वतःहून दूर होत असल्याचे कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला
आपण राज्य सरकारने कोणतेही महामंडळ दिले तरी घेणार नाही असे जाहीर केले.त्याचवेळी आपण कोणत्याही अन्य राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साठी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे जाहीर केले.
सव्वा वर्षांपूर्वी जिल्हााध्यक्ष पदावर सुरेश लाड यांची निवड झाली होती. खा.सुनील तटकरे यांचे नजीकचे सहकारी सुरेश लाड यांच्याकडे जिल्हााध्यक्ष पद आल्यानंतर ते अनेक वर्षे राहील असे बोलले जात होते.मात्र स्वतःच्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील राजकारणाला कंटाळून आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या तक्रारींवर लक्ष देत नसल्याने पक्षाच्या जोखडात अडकून पडण्यापेक्षा आपल्याला स्वतंत्र मिळावे यासाठी पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड जिल्ह्यात असताना जिल्हा अध्यक्ष हे दिवेआगर येथील कार्यक्रमाला उपस्थित न राहता पत्रकार परिषद घेऊन पदाचा राजीनामा असल्याचे जाहीर करीत होते. मात्र केवळ पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याचे जाहीर केले नाही तर सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात आपल्या कार्यकर्त्या हस्ते पोहोचविला असे देखील पत्रकार परिषदेत जाहीर केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता उपस्थित नव्हत
जिल्हााध्यक्ष पदाचा राजीनामा देताना आपल्याला कोणतेही दुःख होत नसून आपण समाधानी असून माझ्या व्यवसायावर शिंतोडे उडविणार्यावर आता आपण मामा भाचे यांचा व्यवसाय काय ? हे शोधून जनतेसमोर आणणार असून त्यासाठी आपले काहीही झाले तरी त्याची किंमत मोजायला तयार आहोत.
सुरेश लाड,माजी आमदार