| कोल्हापूर | वृत्तसंस्था |
कोल्हापुरात भीषण अपघातात चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रकने चिरडल्याने चार मजूर ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.17) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. टेम्पोला जोडलेले सेंट्रिंगचे मिक्सर मशीन रस्त्याकडेला उभे करत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच 12 एलटी 7095 या ट्रकने मजुरांना जोराची धडक दिली. यात सचिन धनवडे (वय 40), बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32) आणि श्रीकेश्वर पासवान (वय 60) असे एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात मजूर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.