ठाण्यात ठाकरेंचा निर्धार; गद्दारांचे डिपॉझीट जप्त होणार

। मुंबई । प्रतिनिधी ।

गद्दारांना गाडलंच पाहिजे. गद्दारांना गाडा ही फक्त घोषणा असता कामा नये. ही शिवसेना ठाण्याची शिवसेना आहे. आनंद दिघेंचं वाक्य होतं की, गद्दारांना क्षमा नाही. चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं ते त्यांना स्वत:ला समजायला पाहिजे. ते आता ठाणेकर करुन दाखवणार आहेत. गद्दारांना क्षमा नाही. राजन विचारे निष्ठावंत शिवसैनिक आहे, राजन विचारेंनी स्टॅडिंग कमिटी सोडली नसती तर हे भूत जन्मालाच आले नसते. आनंद दिघेंचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही. याला निष्ठा म्हणतात. गद्दारांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर दाखवण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की, राजनचा विजय तर होणार आहेच. पण राजन विचारेंचा विजय हा गद्दारांचे डिपॉझिट जप्त करुनच झाला पाहिजे. फक्त गोंधळून जाऊ नका. धनुष्यबाण चोरांच्या हातात आहे, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोदी-शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुमच्या पराभवामुळे भारतात जल्लोष होणार आहे. नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाला केक खायला मोदी गेले होते. 10 वर्षात 56 इंच छाती 156 इंच झाली पाहिजे होती. जो कामाचा नाही. तो रामाचा कसा होईल? राम राज्य पाहिजे. तुम्ही काहीच काम केले नाही. 80 कोटी जनतेला तुम्ही जेवण देताय? आम्ही यांच्या हाताला काम देणार आहोत. मुस्लिम, ख्रिश्‍चन समाज आमच्या बरोबर येत आहे. एक वेळी लोक मोदी मोदी बोलायचे आता हुकूमशहा बोलत आहेत. हे सरकार गजनी सरकार.. काल काय बोललेले आज आठवत नाही. यांच्याकडे धुणीभांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे. कोशारी तुमचा नोकर होता. त्याने छत्रपती, फुलेंचा अपमान केला. काही बोलले नाही? सुप्रिम कोर्टाने सांगितले कोशारी चुकीचे होते. मोदी तुम्ही सर्वेच्च न्यायालयावर दबाव आणताय.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, परभणीची सभा, कोल्हापूरची सभा, धाराशिवची सभा आणि सगळ्याच पाहा. धारशिवची जी सभा होती, अंगावरची रोमांच यावा, लाखो लोक आणि आपण आईचा गोंधळ घालतो. आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती, असं त्या सभेचे स्वरुप होते. लोक पेटले आहेत, चिडले आहेत. कधी एकता मतदानाची तारिख येते आणि यांना रिटायर नाही तर गेटआऊट करण्याची लोक वाट पाहात आहेत. किती मस्ती आली आहे. एकतर यांच्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही. माझा शिवसैनिक निष्ठावान आहेत. त्यांना म्हणतात ये सगळं सोडवून देतो. पण मढवी तुरुंगात आहेत. भाजपात किंवा मिंध्यांकडे जायला तयार आहे. यांना माझ्या मढवींना तुरुंगात टाकलं, मी उद्या यांना तुरुंगात टाकणार आहे.

Exit mobile version