ठकुबाई घरत यांचे निधन

| उरण । वार्ताहर ।
लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या 1984 सालच्या जासई येथील शेतकरी लढ्यात हिरीरीने सहभाग घेणार्‍या ठकुबाई शांताराम घरत यांचे सोमवारी ( दि 3) वुध्दपकाळांनी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. कामगार नेते रवि घरत यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते. जासई येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. त्यांना चार मुले व एक मुलगी असा परिवार आहे. माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी मेघनाथ तांडेल यांच्या त्या मातोश्री आहेत. त्याचा दशक्रिया विधी व तेरावा जास इ येथील राहत्या घरी पार पडणार आहे.

Exit mobile version