• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

नव्या वादाचा जन्म

Varsha Mehata by Varsha Mehata
September 13, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोणताही कायदा म्हणजे त्याची निव्वळ शाब्दिक व्याख्या नव्हे. कायदा करण्यामागचा हेतू आणि त्या शाब्दिक चौकटीमागे दडलेला भावार्थ किंवा कायद्याचे स्पिरीट हे अनेकदा अधिक महत्वाचे असते. 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. देशात हिंदू-मुस्लिम दंगे उसळले. मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. देशात दुहीचे वातावरण तयार झाले. या पार्श्‍वभूमीवर धार्मिक स्थळविषयक कायदा करण्यात आला. त्यानुसार, 15 ऑगस्ट 1947 ला देशातील धार्मिक स्थळांची जी स्थिती असेल तिच्यात बदल न करण्याचे ठरवण्यात आले. (या कायद्यातून केवळ अयोध्या वगळण्यात आली होती. कारण, तेव्हा ते प्रकरण न्यायप्रविष्ट होते.) मंदिर-मशीदीवरून देशात पुन्हा असा धार्मिक उन्माद उफाळू नये हे त्या कायद्यामागचे स्पिरिट होते. देशातील बहुतेक सर्वांनी तेव्हा या कायद्याला सहमती दर्शवली होती. पण तीस वर्षांनंतर ही सहमती व ते स्पिरीट नष्ट होताना दिसते आहे. काशीच्या ज्ञानव्यापी मशीद परिसरात शृंगारगौरी पूजेसंदर्भातील याचिकेवरील मुस्लिम पक्षकारांचे आक्षेप वाराणसी जिल्हा न्यायालयाने सोमवारी फेटाळले. मशीद संकुल परिसरात असलेल्या या मूर्तींची पूजा रोज करू द्यावी अशी हिंदू याचिकाकर्त्यांची मागणी आहे. मध्यंतरी मशिदीच्या वजू खाना भागात शिवलिंग सापडल्याची चर्चा होती. याच रीतीने इतर भागात पुरातन शिवमंदिराचे विविध अवशेष असावेत असा हिंदू मंडळींचा दावा आहे. यांच्या पूजेलाही परवानगी मिळावी असेही त्यांचे म्हणणे आहे. मशीद कमिटीचा याला विरोध आहे. या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिर व बाजूला मशीद अशी दोन्ही धर्मस्थळे गेली शेकडो वर्षे अस्तित्वात असल्याने तीच स्थिती कायम ठेवावी असे मुस्लिम गटाचे म्हणणे आहे. नियमित पूजेचा अधिकार मागणारी याचिका हे एक निमित्त आहे. त्यातून पुढे या सर्व परिसरावरच दावा केला जाईल व हा वादही अयोध्येच्या मार्गाने जाईल अशी साधार भीती त्यांना वाटते आहे. हिंदू संघटनांचा सध्याचा पवित्रा आणि सत्तारुढ भाजपचा त्यांना असलेला सक्रिय पाठिंबा पाहता ही भीती अनाठायी नाही. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या काळात तर मथुरा व काशीचा निकाल लावण्याची भाषा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. इतके की खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनादेखील त्यांना काहीसे आवरावे लागले होते. प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधणे गैर आहे असे उद्गार तेव्हा त्यांनी काढले होते. पण तरीही काशी व मथुरेतील कोर्टबाजी थांबलेली नाही. आणि आता वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निकालामुळे नव्या विवादासाठी कवाड सताड उघडले गेले आहे. 1991 च्या धार्मिक स्थळविषयक कायद्याच्या स्पिरिट लक्षात घेऊन नियमित पूजेची हिंदू पक्षाची याचिकेवरची सुनावणी मान्य होणार नाही असे अनेकांना वाटत होते. पण न्यायालयाने या कायद्याचा आपल्या परीने वेगळा अर्थ लावला आहे. हिंदू याचिकाकर्त्यांनी मशिदीवर दावा सांगितलेला नाही वा तिच्या धार्मिक स्वरुपात बदल करण्याची मागणी केलेली नाही. त्यामुळे पूजेची मागणी 1991 च्या धर्मस्थळविषयक कायद्याच्या विरोधात जात नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. पण हिंदू पक्षाने तूर्तास मशिदीचे मंदिर करण्याची मागणी केलेली नसली तरी मशिदीच्या परिसरात नियमित हिंदू पूजेला मान्यता मिळवू पाहणे म्हणजे दीर्घ काळात धर्मस्थळाचे स्वरुप बदलण्याच्या दिशेने जाण्यासारखे आहे हे कोणालाही कळू शकेल. बाहेर तशा घोषणा व आंदोलने चालू आहेतच. न्यायालयाने या सर्व स्थितीचा एकत्रित विचार करायला हवा होता. या निर्णयाला आता मशिद कमिटीतर्फे उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल. त्यानंतर बहुदा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल. यामध्ये अर्थातच बराच काळ जाईल. पण तोच सर्वात धोकादायक ठरेल. कारण, न्यायालय कोणत्या बाजूने निकाल देईल हे अनिश्‍चित असल्याने तोवर दोन्ही बाजूच्या लोकांना भडकाऊ वक्तव्ये करण्यास मोकळे रान मिळेल. त्यावर राजकीय पोळी भाजून घेतली जाईल. समाजात सतत तणाव राहील. त्याचे परिणाम देशभर जाणवत राहतील. अयोध्या प्रकरणात सर्व देशाने प्रदीर्घ काळ हे पाहिले व भोगले आहे. काशीच्या निमित्ताने याची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. दोन्ही बाजूच्या सुजाण मंडळींनी हे टाळायला हवे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अलिबाग-वडखळ रस्त्याची लक्तरे

Next Post

कोरोनाशी लढणार्‍या ‘शैलजा टीचर’

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
alibag

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
Next Post

कोरोनाशी लढणार्‍या ‘शैलजा टीचर’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?