। बदलापूर । वृत्तसंस्था ।
एरंजाडच्या उल्हास नदीच्या पुलाजवळ बुधवारी (दि. २३) सकाळी 11 वाजताच्या सुमारास एका रिक्षाचालकाने बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाऊन रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून त्याने थेट नदीत उडी मारल्याची घटना घडली आहे. गुरुनाथ म्हात्रे असं मयत रिक्षा चालकाचं नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहून त्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह अग्निशमन दलाने नदीच्या बाहेर काढला. मात्र रिक्षा चालकाने टोकाचं पाऊल का उचललं? याचं कारण अद्याप समजलेलं नाही.