फरार आरोपीला अटक

। पालघर । प्रतिनिधी ।

वसईच्या एका गावात चुलत भावाच्या लग्नासाठी 21 मे 2001 रोजी आलेल्या पीडित महिलेला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास 5 आरोपींनी शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना 24 वर्षापासून बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शांताराम वरटा (49) हा नातेवाईकांना भेटण्यासाठी अधून मधून राहत्या गावी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो मागील 24 वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता.

या गुन्ह्यात न्यायालयाने अटक केलेल्या इतर आरोपींना 19 नोव्हेंबर 2005 रोजी दोषी ठरवून बलात्कार या गुन्ह्यासाठी प्रत्येकी 5 वर्षे सक्त मजुरी व 2 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने सक्त मजुरी तसेच कलम 323 मध्ये 1 वर्ष साधी कैद, पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद ही शिक्षा दिलेली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिळून आल्याने त्याला 17 ऑगस्टला अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. तसेच, न्यायालयात या आरोपी विरुद्ध न्यायहेतूसाठी लवकरच पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्यात येणार आहे.

Exit mobile version