आमदारांची होणार शीरगणती
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सुरू असलेल्या राजकीय भूकंपाने सर्वत्रच खळबळ माजली असून त्याचे पडसादही सगळीकडे उमटताना दिसत आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार असून सरकार राहणार की जाणार हे उद्या ठरेल.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे. काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं होतं. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकर आता विशेष अधिवेशन लावलं जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला उद्या १० ते ५ ची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकार राहणार की जाणार हे उद्या ठरणार असून याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.