देशाच्या अन्नदात्यासमोर अहंकाराचे मस्तक झुकले

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली. या निर्णयामुळे राहुल गांधी यांनी अन्नदात्याने अहंकार झुकवला असल्याचे सांगत शेतकर्‍यांचे अभिनंदन केले आहे.

शेतकर्‍यांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितले कि, सरकारने संतप्त शेतकर्‍यांची समजूत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक व्यासपीठांवरून त्याच्याशी बोललो, पण त्यांनी मान्य केले नाही. त्यामुळे आता हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली असून आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू. एमएसपीसोबतच शेतकर्‍यांच्या इतर प्रश्‍नांवरही सरकारने चर्चा करावी, असे म्हटले आहे.

लोकशाही आंदोलनातून जे साध्य होऊ शकत नाही ते आगामी निवडणुकांच्या भीतीने साध्य होऊ शकते- पी. चिदम्बरम
लोकशाही आंदोलनातून जे साध्य होऊ शकत नाही ते आगामी निवडणुकांच्या भीतीने साध्य होऊ शकते. तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा धोरण बदलून किंवा हृदयपरिवर्तनाने प्रेरित नाही. असो, हा शेतकर्‍यांचा आणि शेती कायद्याला अविचल विरोध करणार्‍या काँग्रेस पक्षाचा मोठा विजय आहे.

Exit mobile version