सावधानतेचा इशारा! राज्यात पावसाचा जोर वाढणार

| पुणे | प्रतिनिधी |
राज्यात कोकणासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पालघर आणि घाट भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शक्यतो आठवड्याच्या शेवटी घरीच रहा, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. जोरदार पाऊस झाल्यानं सखल भागांत पाणी साचले असून याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील आठवडाभर राज्यात पावसाला पोषक स्थिती असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

Exit mobile version