दहशतवादी कृत्य नसल्याचे रायगड पोलिसांकडून जाहीर
| दिघी | वार्ताहर |
हरिहरेश्वर किनारी सापडलेल्या बोटीचा रायगड पोलिसांकडून पूर्ण करण्यात आला आहे.दहशतवाद कृत्याशी या बोटीचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे.
18 ऑगस्टला सकाळी संशयित बोट सापडली होती. या बोटीत तीन एके 47 रायफली सापडल्या होत्या. बोट बेवारस स्थितीत मिळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीवर्धन पोलीस ,कोस्ट गार्ड , दहशतवाद विरोधी पथक, आय.बी. भारतीय नौसेना, कस्टम, सागरी सुरक्षा पोलीस दल या विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी भट देऊून सदर बोटची पाहणी केली होती. आक्षेपार्ह काहीच नाही.
बोट सागर किनार्यावरील रेतीमध्ये अद्यापही अडकलेली आहे. प्रयत्न करूनही ती किनार्यावर घेणे अथवा समुद्रामध्ये नेणे शक्य झालेले नाही. बोटीवरील सर्व साहित्याची डॉग स्कॉड आणि बी.डी.डी.एस.मार्फत तपासणी करण्यात आली असून काहीही आक्षेपार्ह मिळून आलेले नाही. सदर बोटीच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकामार्फत मुंबईत काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बोटीवर मिळालेले शस्त्र, दारूगोळा व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. नवी मुंबईतील दहशतवाद विरोधी पथक यांच्या मार्फत अधिक तपास करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत झालेल्या चैकशीवरून सदर प्रकरणामागे दहशतवादाचा कोणताही पैलू दिसून येत नाही असे रायगड पोलिसांनी सांगितले.