भारतीय कलाविश्‍वाची कधीही भरून न येणारी हानी ; प्रियंका गांधी

। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

सुरश्री लता मंगेशकरजी यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्‍वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. ईश्‍वर लताजींना श्रींच्या चरणी स्थान देवो आणि या दु:खाच्या प्रसंगी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची हिंमत देवो. – प्रियंका गांधी.

Exit mobile version