दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला

नागरिकांकडून बांधकामाची तोडफोड; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

। नागपूर । वृत्तसंस्था ।

नागपूरच्या दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला असून काही नागरिकांनी येथील पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड केली आहे. या भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असा दावा या नागरिकांनी केली आहे. दरम्यान, याठिकाणी पोलीस अधिकारी दाखल झाले असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याप्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. वंजित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पुढे बोलताना, आमचाही या पार्किंगला विरोध असून आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. दीक्षाभूमी, नागपूर येथील कुठलीही पार्किंगची मागणी नसताना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला. याविरोधात जनता उतरली आहे. ट्रस्टीनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे. याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. दीक्षाभूमी हा जनतेच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर करून दीक्षाभूमीचा विकास व्हावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले.

नागपूरमधील दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र, लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री
Exit mobile version