एमआयडीसी विरोधी आंदोलनाची पुढील दिशा गडबच्या बैठकीत ठरणार- आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी मोर्चात सहभागी होऊन जिल्हाधिकारी यांच्या कडे शेतकर्‍यांचा नियोजित डोलवी एमआयडीसी प्रकल्पास असलेला विरोध मांडला तसेच विधिमंडळ अधिवेशनात सरकार समोर शेतकर्‍याची बाजू मांडताना येथील विकास स्थानिकांना विश्‍वासात घेवून येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करून केला जावा असे नमूद केले आहे. त्यामुळे पेण येथील शेतकर्‍यांच्या विरोधापुढे राज्य सरकार नरमणार असल्याची शक्यता वर्तविली जात असून एमआयडीसी विरोधी आंदोलनाची पुढील दिशा गडबच्या बैठकीत ठरणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
प्रस्तावित डोलवी एमआयडीसी संघर्ष समितीच्या वतीने 11 गावातील शेतकरी व ग्रामस्थांचा एमआयडीसी भुसंपादन रद्द करावे या प्रमुख मागणीसह व खारेपाण्याने भिजलेल्या शेतीची नुकसान भरपाई मिळावी, जेएसडब्लु कंपणी मुळे होणारे प्रदूषण व पर्यावरनाचाहास यावर नियंत्रण असावे. व इतर मागण्या घेवून अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्‍यांनी विराट मोर्चा काढला होता. बाधित 11 गावच्या शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी पेण रोहा तालुक्यातील अनेक शेतकरी तशेच ग्रामस्थ विशेषता कासु विभागातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी काळाची पावलं ओळखून मोठ्या प्रमाणात मोर्चात सामील होऊन पाठींबा दिला. या मोर्चात अनेक राजकीय व सामाजि क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांची शेतकरी प्रतिनिधीनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की, मी तुमच्या सोबत आहे, या भागाच्या विकासाकरिता सर्वांनी एकत्र यावे. आजची तरुण पिढी सक्षम आहे. त्यांना विकास काय हे कळतेय. त्यामुळे विकासाची भाषा करणार्‍यांनी स्थानिकांना काय हवयं ते पहिल्यांदा पाहावे. जेएसडब्लु या खाजगी कंपनी साठी होऊ घातलेला एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा, या अगोदरच यातील काही गावांना सिडको आरक्षण पडलेलं असताना त्यात एमआयडीसी कसं आणता, या संपूर्ण विभागात आर झोन ची मागणी केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. असं असताना सरकारने जर आपलं म्हणणं ऐकलं नाही तर मोठं जणआंदोलन उभारले जाईल. त्यासाठी लवकरच गडब येथे शेतकर्‍यांची बैठक घेवून पुढील रणनीती ठरवली जाईल. असे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, शेतकरी कमिटी संयोजक के. जी. म्हात्रे, गजानन पेढवी, विजय पाटील, सीताराम चवरकर, सदानंद ठाकूर, परशुराम म्हात्रे, अ‍ॅड. देविदास म्हात्रे, प्रभाकर पाटील, एकनाथ म्हात्रे, के. पी. पाटील , दिलीप पाटील, दिनेश म्हात्रे, बळीराम कोठेकर, राजू पाटील, महेंद्र पाटील, प्रविण म्ळात्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version