बंदी असतानाही जंजिर्याची भुरळ कायम
हिरवीगार वनश्री, धबधबे ठरताहेत आकर्षण
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुसळधार पाऊस पडत असल्याने मुरूड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळी पर्यटन करणार्या पर्यटकांचीदेखील संख्या काहीशी रोडावली आहे. जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद आहे. तरीही कोणत्या ना कोणत्याही मार्गाकडून पावसाळ्यातील जंजिरा पाहण्यासाठी येत आहेत. तालुक्यातील सवतकडा, फणसाड, आंबोली धरण, गारंबी धरण परिसरातील प्रवाहित धबधबेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
जंजिरा किल्ल्यावर वादळी पासवसामुळे जोरदार लाटा धडकत आहेत. अतिवृष्टीमध्ये अशा लाटा 20 ते 30 फूट उंच उसळत असताना दिसून येतात. किल्ल्यावर हिरवीगार वनश्रीने शाल पांघरली आहे; परंतु खवळलेल्या समुद्राच्या लाटांमुळे जंजिरादेखील रौद्र दिसून येत आहे. पावसाळा व्यतिरिक्त अन्य सिझनमध्ये दरवर्षी पाच लाखाहून अधिक पर्यटक जंजिर्यास भेट देतात. देश-विदेशातील पर्यटकांचा यात समावेश असतो. पावसाळ्यात खोरा जेट्टी अथवा राजपुरी जेट्टीवरून जंजिरा बाहेरून पाहू शकता. पावसाळ्यात जंजिरा पाहणे हा साहसी आणि रोमांचकारी क्षण असतो. पावसाळ्यात काशीद, नांदगाव, मुरूड बिचवरील पर्यटन थंडावले आहे.