आक्षीतील रस्ते झाले चकाचक

ग्रामस्थांचे आ. जयंत पाटील यांना धन्यवाद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यांचे काम आज पुर्ण करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण आक्षीतील रस्ते चकाचक झाल्याने ग्रामस्थ सुखावून गेले आहेत. आ. जयंत पाटील यांनी आक्षीकर ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करीत रस्त्याचे काम पुर्ण केल्याने ग्रामस्थांनी आ.जयंत पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.

अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे आश्‍वासन आमदार जयंत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. या कामाला निधी उपलब्ध करुन कामाचा शुभारंभ देखील तातडीने करण्यात आले होते. या कामावर आ. जयंत पाटील जातीने लक्ष देऊन सातत्याने माहिती करुन घेत होत. कामाचा दर्जा राखण्याच्या सुचना देखील त्यांनी संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार आक्षी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्याचे कामआज पूर्ण झाले. त्यामुळे आमदार जयंत पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने ग्रामस्थांन धन्यवाद दिले आहेत. आक्षी स्तंभ ते समुद्र किनारा व साखर कोळीवाडा या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तसेच हा रस्ता नवीन करावा यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गटनेते अ‍ॅड.आस्वाद पाटील, माजी सदस्य संजय पाटील यांच्या सह आक्षी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार वाळंज, उपसरपंच, सदस्य आणि आक्षी मधील शेकाप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते.

Exit mobile version