राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार

1 एकरमागे 75 हजार रुपये देण्याची घोषणा

। मुंबई । वृत्तसंस्था ।

सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच 1 एकरमागे 75 हजार रुपये देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजना सुरु केली. केंद्रासह राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये टाकणार आहे. विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही. जवळपास दीडलाख शेतकऱ्यांना शेततळे दिले. ही एक यशस्वी योजना झाली.पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत असताना त्यांनी जमीन नापिक होण्यावर खंत व्यक्त केली आहे.

तसेच शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येणार आहे. जितके अ‍ॅग्रीकल्चर फीडर आहेत, हे सगळे सोलरवर चालवण्यात येणार आहेत. हे फीडर सोलरवर आणण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्यात येणार हे काम यंदाच्या वर्षी सुरु करण्यात येत आहे.

सरकारी जमीनीसह शेतीमध्ये फारसं काही पीकत नसले तर ती शेती 30 वर्ष भाड्याने घ्यायला राज्य सरकार तयार आहे. शेतीची मालकी तुमची असणार आहे. वर्षाला 75 हजार रुपये भाडं देण्यात येईल. इतकेच नव्हे तर दरवर्षी 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Exit mobile version