• Login
Monday, August 8, 2022
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सर्वसामान्य, शेतकरी, कामगारांचा आवाज पोरका झाला….

Madhavi Sawant by Madhavi Sawant
January 17, 2022
in sliderhome, कोल्हापूर, राजकिय, राज्यातून, रायगड
0 0
0
२० जणांच्या उपस्थितीत होणार उद्या एन. डी. पाटील यांचा अंत्यविधी
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. भाई. बाबासाहेब देशमुख
(प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र)


बातमी ऐकून काळजामध्ये धस्स झाले. विश्‍वासच बसेना. फोन करून खात्री करावी तर हात थरथर कापत होते. सर्वत्र वार्‍यासारखी बातमी पसरली. मन सैरावैरा झाले. मागील काही महिन्यांमध्ये आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर दुःखातून सावरतो न सावरतो तोवर महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे रत्न म्हणजे प्रा.डॉ.भाई.एन.डी.पाटील यांच्या निधनाने पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला. तसा विचार केला तर स्व. आबासाहेब व प्रा.एन.डी.पाटील यांचे जिव्हाळ्याचे तसेच घरोब्याचे संबंध.

उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे कि, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आबासाहेब व पाटील साहेब या दोन जोडीने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा, कामगारांचा, बहुजन वर्गातील दलित, शोषित, पीडित, पिढ्यानपिढ्या मागासलेल्या कामगार वर्गाचे नेतृत्व केले. शाहू, फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार शेवटपर्यंत जोपासला. सामान्यातल्या सामान्य लोकांच्या अडचणीसाठी संपूर्ण आयुष्य झिजवले.एकेकाळी आबासाहेब विधानसभेमध्ये तर प्रा.एन.डी पाटील सर हे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत होते. महाराष्ट्राच्या विकासामध्ये या दोन्ही महानरत्नांचे फार मोठे योगदान आहे, हे नाकारून चालणार नाही.

पुलोद सरकारमध्ये शेकापक्षाच्या वतीने आबासाहेब व प्रा.एन.डी.पाटील साहेब दोन्ही नेते कॅबिनेट मंत्री होते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण करत असताना कधीही आपल्या तत्वात, मूल्यात, विचारधारेत तसूभर सुद्धा त्यांनी बदल केला नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा हे तात्पुरते आहे. परंतु सर्वसामान्य लोकांचे, पिचलेल्या वर्गाचे कायमस्वरूपीचे प्रश्‍न मिटवण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन्ही नेत्यांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. कामगारांना, उपेक्षितांना न्याय मिळवून दिला. राज्याच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे आधारस्तंभ, कष्टकरी, शेतकरी वर्गाच्या हक्कासाठी लढणारे ते नायक होते. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतमध्ये सीमावाद, कामगार शेतकर्‍यांसाठी आयुष्य वेचणार्‍या सरांचे विचार व कणखर व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी एक प्रेरणा स्त्रोत होते.

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या पिचलेल्या वर्गाची सात दशके त्यांनी सेवा केली. राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास आणि आमच्यासारख्या तरुणांचे ते मार्गदर्शक होते. प्रचंड वाचन, अफाट स्मरणशक्ती, प्रभावी वक्तृत्व, अहोरात्र कष्ट, उच्च प्रतिभाशक्ती ही पंचतत्वे सरांच्या व्यक्तिमत्वात कायमच दिसून येत. त्यांनी आयुष्यभर तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. विचाराशी कधीही फारकत घेतली नाही.

महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं केली. त्यामध्ये श्‍वेतपत्रिकेचे कृष्णरूप, कोल्हापूर येथील टोल आंदोलन, कापूस एकाधिकार योजना, वीज आंदोलन, काँग्रेस सरकार आणि शेतकर्‍यांची लूट, शेतमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत, शेवटी हे शिक्षण तरी कोणासाठी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारखे लिहिलेले वैचारिक ग्रंथ, खर्‍या अर्थानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी मार्गदर्शक ठरतील.

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच साहित्य आणि वैचारिक लेखन क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा आम्हाला सदैव अभिमान राहील. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणार्‍या एका विचारवंताच्या फळीचे पाटील सर प्रतिनिधी होते. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा होता.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या विचाराचे कृतीशील वारसदार म्हणून अखेरपर्यंत त्यांनी काम केले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे एकमेव व प्रभावी साधन आहे, या विश्‍वासाने गोरगरीब उपेक्षितांच्या उन्नतीसाठी रयत शिक्षण संस्थेचा कारभार पाहिला. त्यांना अनेक मोठमोठ्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले आहे. स्व.आबासाहेबांच्या बरोबर प्रा. एन.डी.पाटील यांचे दुःखद निधन होणे आमच्यासाठी हा फार मोठा दुःखद धक्का आहे. मात्र महाराष्ट्रातील तमाम कष्टकर्‍यांचा, शेतकर्‍यांचा, कामगारांचा, उपेक्षितांचा आवाज त्यांच्या प्रेरणेतून, त्यांनी केलेल्या संस्कारातून पुढे असाच चालु ठेवू. एवढच यानिमित्ताने सांगू शकतो.. निशब्द….

Related

Tags: Babasaheb deshmukhkolhapurkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperN.D. Patilonline marathi newspwpskp
Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
पेण

कोप्रोली खारबंदिस्तीबाबत; प्रांतांकडे बैठक

August 7, 2022
कुंडलिकेच्या तिरी, पोलिसांची दादागिरी
रायगड

कुंडलिकेच्या तिरी, पोलिसांची दादागिरी

August 7, 2022
पेणचे बाप्पा निघाले सातासमुद्रापार; 25 ते 30 लाख गणेशमूर्तीची विक्री
sliderhome

गणेशमूर्तींनाही जीएसटीची झळ

August 7, 2022
समुद्राला तुफान आलं या…
मुरुड

समुद्राला तुफान आलं या…

August 7, 2022
वीज बिल प्रति युनिट महागल्याने त्याचा फटका ग्राहकाला
अलिबाग

वीज बिल प्रति युनिट महागल्याने त्याचा फटका ग्राहकाला

August 7, 2022
८ जुलै पर्यंत रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट
sliderhome

रायगड जिल्ह्यात दोन दिवस रेड अलर्ट

August 7, 2022

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?