कल्याणमधील विठ्ठल मंदिरात चोरी

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याणमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी 15 हजार रूपयांचा ऐवज मंदिरातून चोरून नेला आहे.

कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर चोरट्याने पाळत ठेऊन मंदिराचा मुख्य प्रवेशमार्गातील दरवाजा धारदार कटावणीने उघडून मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात असलेली दानपेटी, मंदिराच्या गर्भगृहाजवळील खोलीत देवासाठी लागणारे ताम्हण, पंचपाळ, भजनासाठी लागणाऱ्या टाळ, चकवा, आरतीपत्र अशी एकूण पितळेची 12 भांडी असा 15 हजार रूपयांचा ऐवज मंदिरातून चोरून नेला आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आला त्यावेळी त्यांना मंदिराचा मुख्य दरवाजा तोडला असल्याचे आणि मंदिरात चोरी झाले असल्याचे दिसले. याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

Exit mobile version