। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचे भावविश्व आणि देशाचे कलाक्षेत्र समृद्ध केले. लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी आद्वितीय होत्या, अशी गानकोकीळा पुन्हा होणे नाही. – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र