| अलिबाग । वार्ताहर ।
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरूप वाव देणारी सर्व समावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच दि. 11 नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या स्वरुपाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार,रोजगाराच्या प्रतिक्षेत असणार्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.
योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, प्रशिक्षण दाखला,शैक्षणिक कागदपत्रे, प्रोजेक्ट रिपोर्ट, अपंग असल्यास त्या विषयीचा दाखला इ.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने हीींिीं://ारहर-लाशसि.र्सेीं.ळप या संकेत स्थळावर सादर करणे आवश्यक आहे. जिल्हयातील सर्व सुशिक्षित बेरोजगार/ रोजगाराच्या प्रतिक्षेत असणार्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड- रायगड बाजार समोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, ता-अलिबाग, जि.रायगड- येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.