शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

। औरंगाबाद । प्रतिनिधी ।
औरंगाबाद शहराजवळील शेकापूर शिवारातील एका शेततळयात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. हे तिघेही गावाशेजारी सायकलवरून फिरायला गेले होते. हे तिघे शेततळ्यात कसे पडले याबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. सोमवारी सकाळी शेततळ्यात पडून मृत पावलेल्या तीन मुलांची नावं प्रतिक आनंद भिसे (वय15), तिरूपती मारूती दळकर (15) व शिवराज संजय पवार (वय 17, सर्व रा. सारा संगम, बजाजनगर), अशी असल्याची माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

Exit mobile version