अमरावतीत कार अपघातात तिघांचा मृत्यू; 5 जण जखमी

| अमरावती | वृत्तसंस्था |

अमरावतीत कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास ही कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. याचदरम्यान भातकुली गावाच्या परिसरात भरधाव कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व्यक्तींना उपचारासाठी अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version