। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर येत असून, मुंबईमध्ये तीन दहशतवादी आल्याची माहिती देणारा फोन कॉल मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला आहे. दुबईवरुन शुक्रवारी (दि.7) पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आल्याचं आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. त्यातल्या एकाचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर देखील पोलिसांना संबंधित कॉलरकडून देण्यात आला आहे. या फोन कॉलने मोठी खळबळ उडाली असून, मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. तर पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये तीन दहशतवादी; पोलीस यंत्रणा अलर्ट
