सरकार बदलण्याची वेळ

कंत्राटी पोलीस भरती घातक ; शरद पवारांचा सरकारवर निशाणा

| मुंबई | वृत्तसंस्था |

मी राज्यमंत्री पासून विधिमंडळात काम केले. गृह खात माझ्याकडे होत. त्यामुळे पोलिसांची ड्युटी किती महत्वाची आहे हे मला माहिती आहे. त्यांना आता 11 महिन्यांची नोकरी दिली तर काय होईल. पोलिसांना कत्रांटी पद्धीतीने नोकरीत घेणे हे चुकीचे काम या देशात कोणी केले नाही. ते काम भाजपच्या सरकारने केले . पोलिसांची कंत्राटी भरती हा निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे तसेच पोलीस कुटुंबाच्या दृष्टीने देखील चुकीचा आहे. त्यामुळे हे सरकार बदलण्याची घोषणा आपल्याला केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच अजित पवार गटाला देखील सुनावले. कंत्राटी पोलीस भरतीवरुन त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कंत्राटी पोलीस भरती निर्णय घातक असल्याचे शरद पवार म्हणाले. सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्ता ही लोकांसाठी असते. केंद्र सरकारचे निर्णय सामान्य लोकांच्या फायद्याचा नाही. नोकऱ्या आता कंत्राट पद्धतीने दिल्या जात आहेत. काही नोकरी 11 महिन्यांची आहे. 11 महिने काम केल्यावर पुढे काय करायच?, असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.

कधीकाळी आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. काही लोकांनी दोन दिल्लीच्या कोर्टात आपल्याला नेले आहे. एक निवडणूक आयोग आणि दुसरे सर्वोच्च न्यायालय . या दोन्ही ठिकाणी आपल्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला. जेव्हा निकाल लागले तेव्हा सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या बाजुने निकाल लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

पक्षाच्या वतीने वकील, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे वकिलांना लागेल ती माहिती देत असतात. राज्यात आपलं सरकार गेलं पण तुम्ही लक्षात घ्या देशभरात भाजपसोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत इतर लोक जावू इच्छीत नाहीत. भाजपा देशात दिवसेंदिवस कमी होत आहे हे चित्र आता सिद्ध होत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होत पण नंतर आमदार फुटले. दिल्ली, पंजाब ,उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात भाजपा आहे?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

,

Exit mobile version