। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांमध्ये सभापती, उपसभापती यांचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविला जाणार आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदांमध्ये लागू असलेली प्रशासकीय राजवट रद्द होणार आहे.