| आगरदांडा । प्रतिनिधी |
दिवाळीच्या सलग सुट्टीमूळ महाराष्टातील विविध विभागातील अनेक पर्यटकांनी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी अधिक पंसती दिली आहे. राजपुरी येथे गाडया पार्क करुन जेट्टीवरुन शिडयांच्या होड्याव्दारे किल्लाकडे पर्यटकांना नेले जाते. त्याबरोबर मुरुड समुद्रकिनार्यावर ही सुट्टी साजरी करण्यासाठी असंख्य पर्यटक मुंबई, पुणे, ठाणे व इतर शहरातुन कुटुंबासह मोठया संख्येने समुद्रकिनारी दाखल झाले. तालुक्यातील काशीद-बीच, दत्तमंदिर, गांरबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसरात शांत व रमणीय वातावरण असल्याने पर्यटकांची पंसती वाढती आहे.