महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर पलटी; तीन जण बेपत्ता

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।

कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. महापुराच्या पाण्याच्या ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या घटनेत ट्रॉलीत असणारे सात जण वाहून गेले. त्यातील चार जण सुखरूप असून तीन जण पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात महापूर आल्याने ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि केळी शेतात कामासाठी जाण्याकरिता ट्रॅक्टर ट्रॉलीतुन सात जण जात होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॉली घसरून पलटी झाली. त्यामुळे ट्रॉलीत असणारे सात जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यामध्ये चारजण पाण्याच्या प्रवाहातून बाजूला आल्याने सुखरूप बचावले. तर, अन्य तीन जण वाहून गेले.

वाहून जाणाऱ्यांपैकी एकाच शोध लागला असून दोघांचा अद्यापही शोध लागलेला नाही. तसेच या घटनेनंतर तात्काळ एनडीआरएफचे पथक तैनात झाल्याने शोध मोहीम सुरू आहे.

Exit mobile version