मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

पाच ते सहा किमी वाहनांच्या रांगा

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे महामार्गावर आज (दि.23) सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पुणे मार्गावर वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. सलग चार दिवस सुट्या आल्याने पर्यटक मुंबईकडून पुण्याकडे निघाल्याने नियोजित वेळेवर पोहचण्यास अडथळा निर्माण झाला. ही वाहतूक कोंडी प्रवाश्यांना डोके दुखी ठरत आहे.

शनिवार, रविवार, सोमवारी ख्रिसमस आणि मंगळवारी दत्त जयंती असल्याने शाळा आणि सरकारी कार्यालय बंद असल्यामुळे मुंबईकडील प्रवासी आणि पर्यटक हे पुण्याकडे जास्त प्रमाणात निघालेले आहेत. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गवरील अमृतांजन पुलापासून पाच ते सहा कि.मी.पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अंडा पॉईंट जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. याचा नाहक त्रास वाहन चालक आणि पर्यटकांना सहन करावा लागत आहे.

Exit mobile version