हृदयद्रावक! …अन् डोळ्यासमोर तीन मुलींचा दुर्दैवी अंत

। ठाणे । प्रतिनिधी ।
भिवंडी येथील टेंभीवली भागात कोळशाचा ट्रक रिकामी करत असताना झालेल्या दुर्घटनेत ढिगार्‍यात अडकून तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला. ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर तुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात घरातील सर्व सदस्य कोळशाखाली गाडले गेले होते. घरातील इतर सदस्य वाचले, मात्र तीन मुलींना जीव गमवावा लागला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंभीवली येथील एका झोपडीमध्ये बालारा वळवी हे पत्नी, मुलगा आणि तीन मुलींसोबत राहत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या झोपडीलगत कोळशाने भरलेला ट्रक रिकामी करताना ट्रकमधील कोळसा त्यांच्या झोपडीवर पडला. या घटनेत वळवी कुटुंबीय ढिगार्‍यात अडकले. स्थानिकांनी त्यांना ढिगार्‍यातून बाहेर काढले. यानंतर जखमी अवस्थेत मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version