आक्षी परिसरात वृक्षारोपण

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायतीत बुधवार दि.5 रोजी कृषीदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आक्षी परिसरात वृक्ष लागवड करत वृक्षरोपणाची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शेवग्याची व नारळाची रोपे लावण्यात आली. सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य विनायक पाटील, सदस्या रश्मी वाळंज, निरजा नाईक, ग्रामसेवक श्रीहरी खरात, कर्मचारी निलेश सारंग, सागर कवळे, शेकाप कार्यकर्ते रविंद्र पाटील व ग्रामस्थांनी आक्षी स्मशानभुमी व समुद्र किनारी रोपलागवड केली.

Exit mobile version