। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील 190 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या इयत्ता 12 वीच्या (उच्च माध्यमिक) परीक्षा पासून सुरु झाल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळून घेण्यात येणार्या परिक्षेसाठी येणार्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन तसेच संपूर्ण परिक्षाकेंद्र निर्जंतूकीकरण करुनच परीक्षेला प्रारंभ करण्यात आला.
परिक्षेदरम्यान कॉपी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आठ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. एकूण 31 हजार 873 विद्यार्थी बसले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे केंद्र करण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ झाला. मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यात 16 परीक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली असून परीक्षा 46 मुख्य परीक्षा केंद्र व 144 उपकेंद्रांवर घेण्यात आली.
15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्याच कनिष्ठ महाविद्यालयात तर 15 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा मुख्य परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्रावर घेण्यात येत आहे.