विज पडून दोन दुभत्या म्हशी मृत्यूमुखी; सत्यवाडी येथील शेतकर्‍यांवर संकट

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

परतीच्या मुसळधार पावसात जोरदार झालेल्या विजेच्या कडकडाटात अलिबाग तालुक्यातील सत्यवाडी येथील एका गरीब शेतकर्‍याच्या दोन दुभत्या म्हशींवर विज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सदर शेतकर्‍यावर संकट आले असून त्या म्हशींवर उपजिवीका असल्याने उपासमारीची वेळ ओढवली आहे.

रामराज विभागातील सत्यवाडी येथील धाऊ धोंडू ढेबे यांच्या दोन दुभत्या म्हशींवर आज गुरुवारी विज कोसळली. त्यामुळे होरपळून या म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना समजताच गावचे माजी सरपंच मधूकर ढेबे यांनी त्वरीत तलाठी सजा रामराज, पशूसंवर्धन अधिकारी यांना माहिती देत त्वरीत पंचनामे करुन धाऊ ढेबे यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या दोन्ही म्हशी दुभत्या असल्याने ढेबे यांच्या कुटूंबियांच्या उपजिवीकाचे साधन असल्याने उपासमारीची वेळ ओढवली आहे.

Exit mobile version