| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह खोपोली शहरात बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून दोन तास अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे वीटभट्टी मालकांची मोठीच धांदळ उडाली. कच्च्या वीटा भिजू नये या करिता प्लास्टिक टाकले असले तरी कच्चा भिजल्यामुळे व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यंदा पावसाने सप्टेंबर ते आँक्टोंबर पर्यत हजेरी लावली असल्यामुळे अधूनमधून थंडी कडकडून पडत आहे. बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून दोन तास अवकाळी पावसाने सुरूवात करताच बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली आहे.तर अनेकांनी पावसात भिजण्यासाठीचा आनंद लुटला आहे. मागील महिन्याापासून वीटभट्टीचे काम सुरू झाले असून अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.