नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळीचा तडाखा

| नाशिक | प्रतिनिधी |

नाशिक जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी परिसरात आज सोमवारी (दि. 05) दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. तर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट घेऊन आला आहे. पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. तर कांदा बियाण्यालाही मोठा फटका बसला आहे. यासोबतच आंबा बागांमधील फळांचे देखील नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावाची अनिश्चितता यामुळे चिंतेत असतात. त्यातच निसर्गाच्या या आणखी एका तडाख्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.









Exit mobile version