आदिवासी शेतकर्याचा स्तुत्य उपक्रम
। विश्वास निकम । कोलाड ।
असे म्हटले जाते की, भातशेती परवडत नाही म्हणून लोकांनी शेती करणे सोडून मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करण्यासाठी शहरात गेले व आपल्या जमिनी ओस पाडल्या तर काही विकून टाकल्या. मात्र, याला अपवाद आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाडजवळील चिंचवली येथील आदिवासी शेतकरी बळीराम पवार व त्यांच्या पत्नी जिजाबाई पवार. या शेतकरी दाम्पत्याने शेती परवडत नाही म्हणून परप्रांतात ऊसतोडणी किंवा कोळसा भट्टीवर न जाता आपल्या पाच एकर जमिनीत दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने बारीक कोलम प्रकारचे भातशेती करतात. त्यासाठी शेणखत वापर करतात. या तांदळाचा तालुक्यात खूप मोठी मागणी आहे.
कोणतेही कृषी अधिकार्यांचे मार्गदर्शन नसताना केवळ आपल्या अनुभवाच्या जोरावर शेतकरी बळीराम पवार व जिजाबाई पवार हे शेतकरी दाम्पत्य दरवर्षी 100 क्विंटल तांदूळ पिकवतात. ते पाच हजार रुपये क्विंटल या दराने दरवर्षी विक्री करतात. त्यांना या विक्रीतून हजारो रुपयांचा नफा होतो. आपण शिक्षण घेतले नाही म्हणून अडाणी राहिलो, मात्र ही वेळ मुलांवर येऊ नये म्हणून बळीराम पवार यांनीसुद्धा त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण दिले आहे, ही कौतुकाची बाब आहे. शेतकरी बळीराम पवार यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, अन्य प्रकारचे मोठे जयासारखे भात केले. तर ते पोहाला जाते या हे मधून तेराशे ते चौदाशे रुपये क्विंटल मिळतात. मात्र, कोलम तांदूळ काढून दिले, तर पाच हजार रुपये क्विंटल या दराने विकले जाते. त्यामुळे अन्य शेतकर्यांनी कोलम भात शेती करून तांदूळ विक्री केली तर ते खूप फायद्याचे आहे.
आपली जमीन पडीक न ठेवता ती कसली पाहिजे, जमिनीत मशागत म्हणजे मातृभूमीची सेवा करणे असे शेतकरी बळीराम पवार म्हणतात मात्र कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना शेतीमध्ये बळीराम पवार व जिजाबाई पवार या आदिवासी दांपत्याने वर्षानुवर्षे भात शेती मध्ये कोलम तांदूळ पिकवतात इतर शेतकर्यांनी सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे.