अपघातानंतर प्रशासनाला जाग

बोरघाटातील अपघातस्थळी बसविले लोखंडी सुरक्षा कठडे

| खोपोली | प्रतिनिधी |

बोरघाटातील रस्त्यावर संरक्षण कठडे नसल्यामुळे बस 200 फूट खोल दरीत कोसळून निरापराधांचा जीव गेला. अपघातानंतर प्रशासनाला जाग आली असून, बोरघाटातील अपघातस्थळी लोखंडी सुरक्षा कठडा बसविला आहे. अपघातानंतर तातडीने आय.आर.बी.ने अपघातस्थळी लोखंडी कठडा बांधला आहे व पुढील काळात तेथे अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे, परंतु हेच जर अपघात होण्याच्या अगोदर केले असते तर आज कित्येक लोकांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Exit mobile version