आदिवासी बांधवांचे तहसीलदारांना निवेदन
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली तर्फे अतोने ग्राम पंचायतीचा अजब कारभार हद्दीतील खरबाची वाडी, वडाची वाडी, धनगर माळ, मोठी वाडी या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. येथील ग्रामस्थांनी याबाबतचा पाढा रोहा तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्यासमोर मांडत निवेदन देत ताबतोब आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करा अशी आग्रह मागणी केली आहे. त्या मागणीनुसार रोहा तहसीलदार कविता जाधव व गट विकास अधिकारी शुभदा पाटील यांनी सदरच्या वाडीवर तात्काभ् टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोने ग्राम पंचायत हद्दीतील खरबाची वाडी येथील चार आदिवासी वाड्यांचा समावेश होत असलेल्या या वाड्या काही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत व वाड्यांवर गेल्या महिन्यांपासून येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नव्हे तर नाईलाजाने तळ गाठलेल्या विहिरीतील चिखलमय पाणी पिण्याची वेळ स्थानिक प्रशासक यंत्रणेमुळे आली आहे. पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांनी थेट रोहा तहसीलदार यांच्याकडे धाव घेत याबाबतचे निवेदन रोहा तहसीलदार, गट विकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांना देत स्थानिक कारभाराची हकीगत सांगितली. वरील निवेदांचा ताबतोब पाठपुरावा करण्यात येईल येथील आदिवासी बांधवांना पाणी टंचाईला सामना करावा का लागतो याची माहिती घेऊन त्या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुढील कालावधीत करण्यात येईल, तसेच ग्रामस्थांना या ठिकाणी तात्काळ पिण्याच्या पाण्याची सुविधा ही खाजगी टँकरद्वारे करण्यात येणार असल्याचे आश्वासन रोहा तहसीलदारांनी दिले.
आदिवासी ग्रामस्थांच्या निवेदनावर सदरच्या ग्रामपंचायत कारभाराची माहिती घेतली जाईल. पाणी टंचाईबाबत योग्य ती त्वरित उपाययोजना करून या आदिवासी ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल.
शुभदा पाटील, गटविकास अधिकारी