आ. जयंत पाटील यांची ग्वाही
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच विकास करण्यात आला आहे. जलजिवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्यात येईल अशी ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली.
धोकवडे गोठेश्वर तलाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होणार्या कामांच्या भुमीपूजन समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषदस सदस्य शंकरराव म्हात्रे, सरपंच जयश्री म्हात्रे, सासवणे सरपंच संतोष गावंड आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, तालक्यात जलजीवन योजना चांगल्या प्रकारे राबविली पाहिजे. या योजनेतून नवीन तंत्रज्ञान वापरुन पाण्याच्या टंचाईवर मात करता आली पाहिजे. टांझानिया सारख्या देशात तंत्रज्ञानच्या माध्यमातून विकास साधला जात आहे. आपली स्वतःची या देशात जमीन असून मी स्वतः रोज शंभर एकर जमीन नांगरतो. धोकवडेप्रमाणेच किहीम, नवखार, सासवणे तसेच सारळ आदी गावात देखील जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपस्थितांचे स्वागत सरपंच जयश्री म्हात्रे, सासवणे सरपंच संतोष गावंड यांनी केले. या कार्यक्रमाला गुरुप्रसाद म्हात्रे, पंचायती समिती सदस्या नेहा सचिन म्हात्रे, समिहा पाटील, उपसरपंच सचिन म्हात्रे, ग्रामसेवक जयेश पाटील यांच्यासह धोकवडे गु्रप ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.