दहिवली-मालेगाव पुलाच्या कामाला गती

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;

खराब रस्त्याचीही तात्काळ दुरुस्ती करावी; स्थानिक रिक्षाचालकांची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. मात्र या पुलाचे काम मार्चपूर्वी पूर्ण करावे आणि धामोते ते कोदिवले या भागातील खराब रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रिक्षाचालक यांनी केली आहे.

माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उल्हास नदीवर पूल आहे. दहिवली मालेगाव येथे असलेला जुना पूल 40 वर्षे पूर्वी बांधण्यात आलेला आहे. त्यावेळी बांधलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून महापुराचे पाणी वाहून जाते आणि त्यामुळे वाहतूक बंद होते. त्यामुळे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षे सुरु आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून नवीन पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून या पुलाची मागणी गेली पाच वर्षे सरकारकडे होत होती. या पुलाची गरज असताना आणि दरवर्षी पावसाळ्यात हा पूल चार ते पाच वेळा पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम तकलादू बनले आहे. यावर्षी तर पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती.

2024 पासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून ठेकेदार कंपनीसाठी हा पूल बांधला जात आहे कि वाहने आणि जनतेसाठी? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असताना देखील बांधकाम विभाग संबंधित कामाचा ठेका घेणारे ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याची तसदी घेत नाही. त्याचवेळी पुलाचे कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी संपून गेला आहे. तरी देखील या पुलाचे अर्धे काम देखील पूर्ण झालेले नाही. पुलाचे बांधकाम मंदगतीने सुरू असून स्थित उल्हास नदीवरील या पुलाची झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे दहिवली मालेगाव पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नियंत्रण नसल्याने मागील दोन वर्षापासून सुरू आहे. नवीन पुलाची उंची ही जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा किमान दहा फूट उंच बनविण्यात येत आहे. त्याचवेळी जुन्या पुलावरून पावसाळ्यात उल्हास नदीला महापूर आल्यानंतर किमान पाच फूट उंचीवरून पाणी वाहून जात असते. त्यावेळी भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पुलाची उंची अधिक ठेवण्यात येत आहे. त्यात अनेक महिने रखडलेल्या या पुलाचे काम पुन्हा सुरू झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दहिवली मालेगाव पुलाचे काम जनतेसाठी सुरु आहे कि ठेकेदासाठी? असा प्रश्न पडला आहे. या पुलाचे बांधकाम सुरु होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पुलाचे खांब देखील उभे करून घेण्यात बांधकाम खाते निष्प्रभ ठरले आहे.

श्रावण जाधव, रिक्षाचालक

Exit mobile version