पेण तहसीलदार यांना लेखी निवेदन

| खरोशी । वार्ताहर ।
समाजात महत्त्वाची भूमिका पार पडणार्‍या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबला जात आहे. पत्रकारांवर हल्ले करत खोटे गुन्हे दाखल प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना सुरू असतानाच रत्नागिरी राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. सातत्याने वाढणार्‍या घटनेने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा शुक्रवारी काळ्या लावून निषेध करण्यात आला. पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना वारीसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. दरम्यान, उपस्थित सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून घोषणा देत या घटनेचा जाहीर निषेध केला.

राज्यातील पत्रकारांचा विविध मार्गाने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले, त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाहीत तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा पेण पत्रकारांच्या वतीने देवा पेरवी यांनी दिला. यावेळी पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, नरेश पवार, संतोष पाटील, राजेश कांबळे, स्वप्नील पाटील, विजय मोकल, बांधणकर, प्रशांत पोतदार, राजेश प्रधान, धनाजी घरत, दीपक लोके, प्रकाश माळी, कमलेश ठाकूर, सुनिल पाटील, प्रदीप मोकल आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version