दोन सामन्यांच्या मालिकेत मिळविले यश; दोनच दिवसांत जिंकली कसोटी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या 19 वर्षाखालील युवा संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यजमान कांगारूंची अक्षरशः कत्तल केली असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही. कारण पहिल्या कसोटीत अडीच दिवसांतच ऑस्ट्रेलियन युवा संघाचा खेळ खल्लास करणाऱ्या युवा भारताने चार दिवसांची दुसरी कसोटी ही अवघ्या दोनच दिवसांत जिंकून यजमान संघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. भारताने या मालिकेत 2-0 फरकाने बाजी मारत निर्भेळ यश संपादन केले. तसेच याआधी झालेली एकदिवसीय मालिका ही भारताच्या युवा 3-0 फरकाने जिंकली होती.
ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटीत भारताच्या युवा संघाने यजमानांना डाकाने आणि 58 धावांनी धूळ चारली होती. मॅकमधील दुसऱ्या कसोटीत मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा पूर्णपणे ऱ्हास झाला. त्यांना पहिल्या डावात 135, तर दुसऱ्या डावात जेमतेम 116 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स ली यंग (66 व 38) याने काही प्रमाणात भारतानी गोलंदाजीचा प्रतिकार केला, पण इतर फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्या डावात 171 धावा करणाऱ्या भारताने विजयासाठी मिळालेले 81 धावांचे लक्ष्य 12.2 षटकांत 3 बाद 84 धावा करीत सहज पूर्ण करीत 7 गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या डावात भारताची आघाडी
पहिल्या डाकात ऑस्ट्रेलिया 135 धावांत गारद झाला. यंगने केलेल्या 66 धावांशिकाय बाकी सर्क फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून हेनिल पटेल व खिलन पटेल यांनी तीन-तीन बळी टिपले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 171 धाका करत पहिल्या डावात 36 धावांची आघाडी घेतली. हेनिल पटेल (22) आणि दीपेश देकेंद्रन यांची जोडी आज सकाळी लककर तुटली; पण देकेंद्रनने 28 धाका करून भारताला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून केसी बार्टनने 4 फलंदाज बाद केले.






