नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या पाच दिवसांत दुसर्यांदा 50 हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 48,695 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1,183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी 21 जून रोजी 42,640 रुग्णांची नोंद झाली होती. तसेच, गेल्या 24 तासात 64,818 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहे. त्यामुळे 17,303 सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 48 हजार 698 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 64 हजार 818 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शुक्रवारी 1,183 रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 1 लाख 83 हजार 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 कोटी 91 लाख 93 हजार 85 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात 3 लाख 94 हजार 493 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5 लाख 95 हजार 565 सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण 1.31 टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. देशात 2 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय करोना रुग्णांच्या बाबतीत भारत जगाच्या तिसर्या स्थानी आहे तर एकूण करोनाबाधितांच्या संख्येत जगात दुसर्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.