नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सीबीएससीच्या रद्द झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नियुक्त केलेली समिती 17 जून 2021 ला सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. गेल्या महिन्यात कोरोनामुळे परीक्षा रद्द करा, अशी जनहित याचिका पालकांनी न्यायालयात केला होती. त्यानंतर सीबीएसईने 1 जूनला बारावीची परीक्षा रद्द केली होती, यानंतर अनेक राज्यांनी परीक्षा रद्द केली. सीबीएसईने नियुक्त केलेली 13 सदस्यीय समिती बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युलाचा बाजूने आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज दिले जाईल. इयत्ता 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल.असे समजते.