शिंदे म्हणाले, दिसतील तिथं ठोकणार; तर मुख्यमंत्री म्हणतात, एकही हरवला नाही
। मुंबई । प्रतिनिधी ।
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट इशारा दिला आहे. 107 लोक जे बेपत्ता आहेत ते कुठं लपले असतील त्यांना पोलिसांनी शोधून जिथं सापडतील तिथंच ठोका, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना त्वरीत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर देशात वेगवेगळ्या राज्यातील पाकिस्तानी लोकांची यादी समोर येतेय. यात महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे. त्यांनाही देश सोडण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी लोकांपैकी 107 जणांचा शोध पोलीस आणि इतर तपास यंत्रणांना लागलेला नाही. त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बेपत्ता पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांना जे आश्रय देतील त्यांनाही सोडणार नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडावा. काश्मीरमध्ये झालेला हल्ला दुर्दैवी होता. तिथं जाणं हे माझं कर्तव्य होतं. त्यावरूनही राजकारण केलं जात असल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेपत्ता नागरिकांबाबत बोलताना म्हटलं की, गृहमंत्री म्हणून सांगतो की यावर काहीही बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सगळे सापडलेत. सगळे देशाबाहेर चाललेत. त्यांना बाहेर घालवण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी राहणार नाही.
दहशवाद्यांकडे एके 47
आता पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. आता नुकताच एक अत्यंत मोठी माहिती पुढे आली आहे. दहशतवादी हे -47 आणि 4 येऊन दाट जंगलातून 22 घंटे चालून पहलगामला पोहोचले होते. पहलगामला पोहोचण्यासाठी त्यांनी एका अॅपची मदत घेतल्याचेही सांगितले जाते.
चारही दहशतवादी घनदाट जंगलातून चालत पहलगामला पोहोचले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी दोन दहशतवादी हे खान्याच्या स्टॉलच्या मागून आले. त्यांनी उपस्थित पर्यटकांना कलमा वाचण्यास सांगितले आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. यासोबतच या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ देखील कॅमेर्यात कैद झाला आहे. एनआयएच्या हाती हा एक मोठा पुरावा असल्याचे सांगितले जातंय.