। दिल्ली । वृत्तसंस्था ।
रोहिणी भागात मंगळवारी सायंकाळी गटारात अडकलेल्या चार जणांना सर्व प्रयत्न करूनही वाचवता आलं नाहीय. एनडीआरएफच्या पथकानं चौघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. गटारातून जाणारी टेलिफोन केबल दुरुस्त करण्यासाठी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये दाखल झालेले तीन मजूर अडकले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेला रिक्षाचालकही गटारात अडकला. एनडीआरएफच्या टीमनं रात्रभर बचावकार्य केलं. मात्र, कोणालाही वाचवता आलं नाहीय. पर्यवेक्षक सूरज साहनी, बच्चू आणि पिंटू या दोन मजुरांसह दुरुस्तीसाठी घटनास्थळी गेले होते. सुमारे 15 फूट खोल गटाराचे झाकण काढून बच्चू व पिंटू आत शिरले. गटारात टेलिफोनशिवाय विजेच्या ताराही होत्या. बराच वेळ गेल्यानं सूरज त्यांना पाहण्यासाठी गटारात शिरला. पण, तो स्वतःच आत अडकला.